वृत्तसंस्था
शबनम न्यूज : नवी दिल्ली (दि.२३ मार्च ) : – भारतात आता नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, तर कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही घट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ३१ मार्चपासून सर्व प्रकारचे कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा नियम कायम राहील .तब्बल दोन वर्षांनंतर, गृह मंत्रालयाने 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी मास्कमुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आता कोरोनाची साथ कमी झाल्याने, निर्बंध हटवल्यास आर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील नियंत्रणात आली आहे. आता आवळलेले निर्बंध संपुष्टात आले आहेत.