डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडून आयोजन
शबनम न्यूज : पुणे (दि.२६ मार्च) :- ‘डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘एच.चार.मीट २०२२’ ला चांगला प्रतिसाद मिळाला.२५ मार्च रोजी,सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हॉटेल ब्ल्यू वॉटर ( पुनावळ ) येथे ही एच आर मीट उत्साहात पार पडली.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज,ए-वन व्ह्यू पब्लिकेशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोंनेल मॅनेजमेंटच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले .
‘ अॅकोमोडेशन ऑफ जेन-झेड इन कॉर्पोरेट वर्ल्ड’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. नव्या पिढी पुढील आव्हानांची चर्चा यावेळी झाली.
डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चे कार्यकारी संचालक
विंग कमांडर पी.व्ही.सी. पाटील, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मुख्य मानव संसाधन अधिकारी राज वेलारकर यांच्या हस्ते ,डॉ.भरत चव्हाण-पाटील, डॉ.जे.जी. पाटील यांच्या उपस्थितीत या ‘एचआर मीट’चे उद्घाटन झाले.कार्पोरेट जगतातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
‘नव्या कार्पोरेट जगात जगात जबाबदारी हा महत्वाचा शब्द झाला आहे.जबाबदारी घेणे जड वाटू न देता सकारात्मकरित्या काम करुन जगाला चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. मानवतेला योगदान दिले पाहिजे, ‘ असा संदेश राज वेलारकर यांनी उद्धाटनपर भाषणात दिला.
‘ अॅकोमोडेशन ऑफ जेन-झेड इन कॉर्पोरेट वर्ल्ड’ या परिसंवादामध्ये शावल मूर्ती(विप्रो),डॉ.मीनल राव(थरमॅक्स), पूर्णिमा कुमारी (कोर्टयार्ड बाय मेरीयट), श्रीपाद कुलकर्णी (पंडित कीर्तने चार्टर्ड अकाऊंटंटंस ), सच्चिदानंद कुलकर्णी (सचक कन्सल्टींग ) या मान्यवरांनी सहभाग घेतला.डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ.आशुतोष मिसाळ यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
डॉ. आशुतोष मिसाळ म्हणाले, ‘ नवी पिढी उद्यमशील आहे. जुन्या पिढयांनी त्यांच्या प्रगतीचा पाया तयार केला आहे. मात्र, त्यांनी स्पर्धा, ताणतणावाला तोंड देऊन कामावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. ‘
पूर्णिमा कुमारी म्हणाल्या, ‘ नव्या पिढयांपुढे असलेली आव्हाने पाहता त्यांना ती उद्दीष्ट साध्य करायला वेळ दिला पाहिजे.
सच्चिदानंद कुलकर्णी म्हणाले, ‘ पिढया पिढयांमध्ये फरक करता कामा नये. पण, पुराणकाळापासून हे होत आले आहे. पण मोबाईलच्या वापराने ही पिढी माहितीच्या संदर्भात अधिक अद्ययावत आहे.’
श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, ‘ जगाची विभागणी वय या निकषावर करता येणार नाही. पण नव्या पिढीला शिकायला वेळ दिला पाहिजे. नवी पिढी लवकर कमवायला सुरू करीत आहे. आयुष्य सोपे करण्याकडे त्यांचा कल असतो, गुंता वाढवणे त्यांना मान्य नसते. ‘ आमच्या वेळी आम्ही खूप कष्ट केले, सुविधा नव्हत्या ‘ असे जुन्या पिढीने सांगून चालत नाही.
शावल मूर्ति म्हणाले, ‘ या पिढीची कमिटमेंट लेव्हल चांगली आहे. ते मोठी आव्हाने पेलू शकतात. त्यांना कार्यरत ठेवले तर ते विचलीत होत नाहीत. स्वप्नाळू न होता वास्तवात राहणे त्यांना जमते.
डॉ.मीनल राव म्हणाल्या, ‘ नव्या पिढीला उत्साहवर्धक प्रोत्साहन दिले पाहिजे.