शबनम न्यूज : मुंबई (दि.३१ मार्च) :- गुढीपाडवा सणाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व कोरोना निर्बंध सरकारने काढून टाकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. कोरोना महामारी नियंत्रणासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात साजऱ्या होणाऱ्या सर्व सण, उत्सव आणि सार्वजनिक उपक्रमांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे, तर ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये.कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढाAdvertisement— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022