शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- आकुर्डी परिसरामधे गेल्या ३ – ४ दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे या भागातील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
आकुर्डी परिसरातील विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा व योग्य त्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी निखिल उमाकांत दळवी संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, भोसरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आकुर्डी भागातील आकुर्डी गावठाण, पंचतारा नगर, गुरुदेव नगर, सुभाष पांढरकर नगर, भंगारवाड़ी, शुभश्री सोसायटी परिसर, टेल्को, कपुर कॉलनी, विठ्ठलवाडी, दत्तावाड़ी, रूपेश कॉलनी, श्रीकृष्ण क्रांतिनगर, एकता नगर ,विवेक नगर ,तुळजाई वस्ती या सर्व परिसरामधे गेल्या ३ – ४ दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे या सर्व भागातील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुले उकाड्याने हैराण झाले आहेत, MSEB कम्पलेंट संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता त्याच्या कडुन कोणताही प्रतिसाद मिळत नाही, फोन उचलत नाही किवा फोन बंद करुण ठेवण्यात येतो. जबाबदार वरिष्ठ अधिकारी हे देखील फोन उचलत नाहीत किवा फोनच बंद करून ठेवत असल्याने नागरिकांनी कोणशी संपर्क साधायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
MSEB कडून सामान्य नागरिक वेठीस धरला जात आहे. अजुन पण काही नागरिक घरुन आपले काम करत आहेत ( work from home ) सुरु आहे. अचानक वीज पुरवठा खंडित झाला की त्यांचे काम थांबते या सर्व बाबींचा विचार करता लवकरात लवकर संपूर्ण आकुर्डी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, वारंवार विज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या भोसरी विभागाने योग्य त्या उपाय योजना करव्यात या साठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या भोसरी विभागाला आकुर्डी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या वतीने तक्रारीचे निवेदन दिले आहे.