शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ एप्रिल) :- पुणे व पिंपरी चिंचवड रेल्वे ट्रॅक भोवती असलेल्या झोपडपट्ट्यांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्या झोपडपट्ट्या हटवू नये. अशी मागणी सुरज गजानन बाबर, अध्यक्ष : कृषी, पर्यावरण ,शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांनी अश्विनी वैष्णव, रेलमंत्री ,भारत सरकार,जितेंद्र आव्हाड ,गृहनिर्माण मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महाराष्ट्र यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर पालिका हद्दीतील दापोडी ते देहूरोड पर्यंत रेल्वे रुळाच्या आजूबाजूला या शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य आहे, व या झोपडपट्ट्या हटवण्याची मोहीम केंद्र सरकार रेल्वे विभाग यांनी हाती घेतली आहे तरी या झोपडपट्ट्या अधिसूचित झोपडपट्ट्या असून या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर झोपडपट्ट्या हटवाव्यात अशी मी आपणास विनंती करतो.
महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)S.R.A ची स्थापना केली आहे.पिंपरी चिंचवड परिसरातील झोपडपट्ट्यचा पुढील पुनर्विकास आणि पुनर्वसन या योजनेसाठी कायद्यात आवश्यक बदल करून झोपडपट्टीने व्यापलेली जमीन मूलभूत उत्पन्नाचा स्रोत म्हणून दिली जाते. त्यावर फ्लोअर एरिया इंडेक्स जेणेकरुन झोपडपट्टीतील रहिवाशांना खुल्या बाजारात फ्लॅटच्या विक्रीद्वारे पक्की घरे मोफत मिळू शकतील. प्राधिकरण झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी “नियोजन प्राधिकरण” म्हणून काम करत आहे.
सध्यास्थितीला पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे लगतच्या हजारो संरक्षित आणि अधिसूचित झोपडपट्टी रहिवासी आहेत ज्या एकाच वेळी काढल्या जातील, त्यासाठी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे आनंद नगर, दळवी नगर, साईबाबा नगर, भोईर नगर, निराधार नगर या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याची कोणतीही तरतूद नाही. यामुळे मी रेल्वे प्रशासनाला विनंती करू इच्छितो की आपण जोपर्यंत या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या रेल्वे लगतच्या झोपडपट्ट्या हटवू नये, व आपण तूर्तास हाती घेतलेली मोहीम थांबवावी ही आपणास पुणे व पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने नम्र विनंती.
तसेच मी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (S.R.A )महाराष्ट्र शासन आपणास विनंती करतो की, रेल्वेट्रॅक भोवती राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांमध्ये घबराहट निर्माण झालेली आहे, आपण तात्काळ रेल्वे ट्रॅक लगत असणाऱ्या झोपडपट्टीवासी यांचे पुनर्वसन करावे जेणेकरून या नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, तसेच पुनर्वसनाबाबतची माहिती आम्हाला तसेच रेल्वेस प्रशासनाला आपणाद्वारे तात्काळ कळवावी.असेही सुरज बाबर यांनी नमूद केले आहे.