वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२७ एप्रिल) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कोविडबाबतीत पंतप्रधान घेत असलेली ही २४ वी बैठक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे कर कमी करावे याबाबत पंतप्रधानांकडे स्पष्ट भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना आढावा बैठकीमध्ये इंधनाच्या दरांबद्दल चिंता व्यक्त करताना भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांची नावं घेत या राज्यांमधील इंधनाचे दर अधिक असल्याचं अधोरेखित केलं.
दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. आज पंतप्रधानांनी करोनासंदर्भातील बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला, मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे त्यावर ठाकरेंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गगनाला भिडले आहे. इंधनदरवाढीवरून राज्य सरकार आणि केंद्रामध्ये वाद पेटला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले आहे कि, आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही, असं स्पष्ट उत्तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.
• मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा.
Advertisement• पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर.
• राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले, ही वस्तुस्थिती नाही.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2022
Advertisement
महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
• संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त १५ टक्के जीएसटी गोळा होतो
• थेट कर आणि जीएसटी एकत्र केल्यास महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे
Advertisement• तरीही महाराष्ट्राला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2022
आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करीत आलेली आहे, मात्र केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाही. असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
• आपत्तीच्या वेळी राज्य सरकारने वारंवार राज्यातील एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे केली, मात्र केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाही.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2022