शबनम न्युज | पिंपळे सौदागर
पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस पाण्याच्या प्रश्न संदर्भात मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, २२ एप्रिल रोजी लेखी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते परंतु या समस्येबाबत पालिका प्रशासन गंभीरपणे विचार करत नाहीये. म्हणून पाणीपुरवठा विभागाच्या या गैरजबाबदार वागणुकीचे कारण व त्यावरील उपाय याबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक रहिवासी व प्रशासन यांची एक बैठक आयोजित करावयाची आहे आणि त्यासाठी त्यांच्या वेळेची उपलब्धता त्यांनी सुचवावे या बाबत लेखी निवेदन दिले आहे.
पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस पाण्याच्या प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा बाबत नागरिकांनी कशी बशी तडजोड केली होती परंतु त्यातही होणारा पाणीपुरवठा हा अनियमित व कमी दाबाने असल्याने आता मात्र नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस टँकर्सवर सोसायटी ना जास्त प्रमाणात अवलंबून रहावे लागत आहे. आज परिस्थिती इतकी वाईट आहे की टँकर्स सुद्धा मिळने आव्हानात्मक झाले आहे. पिंपळे सौदागर परिसरात ७०% पेक्षा जास्त नागरिक आयटी क्षेत्रात काम करतात आणि पालिकेला सर्वात जास्त कर संकलन देखील याच भागातून प्राप्त होतो तरी देखील पालिका त्यांना पर्याप्त गरजेपुरते पाणी पुरवठा करण्यास असमर्थ आहे. प्रशासनाला आता जागे व्हावे लागले अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.