शबनम न्युज | पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अक्षय्य तृतीया निमित्ताने ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरात महाआरती करण्यात येणार होती. पण रविवारी राज ठाकरे यांची सभा झाल्यावर चर्चा करून, ३ तारखेची महाआरती स्थगित करून ४ मे रोजी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात येणार आहे,अशी माहिती मनसेचे सर चिटणीस अजय शिंदे यांनी दिली.
औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असताना, आता अक्षय तृतीय निमित्ताने मनसेकडून राज्यभरात घेण्यात येणारी महाआरतीला स्थगिती देऊन ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
Advertisement