शबनम न्युज | पुणे
शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती असल्याची टीका आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी टीका केली.
त्या म्हणाल्या कि, “कोरोना महामारीमधून महाराष्ट्र बाहेर पडत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत. यासाठी हा महाराष्ट्र एकत्र येतो, लढतो आणि या लढाईच्या विरोधात जिंकतो देखील. महाराष्ट्राला सावरण्यासाठी विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे. या महाराष्ट्रात वाद कसा निर्माण होईल, याकडे काहींचं फार लक्ष असते. त्या लोकांचे कोणते व्हिडिओ, कोणते फोटो आहेत हे मला माझ्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे वाटत नाही.”सध्या जे काही चाललं आहे ते शांत महाराष्ट्राला अशांत करायचं ही विकृत मनोवृत्ती वाटत आहे.” असं म्हणत खासदार नवनीत राणा यांना त्यांनी टोला लगावला.