ऋषिकेश कुलकर्णी (राजकीय विश्लेषक)
संचालक – अल्गोरिदम स्ट्रॅटेजी कन्सल्टींग
संपर्क 89 75 04 48 98
गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि नुकताच कार्यकाल संपलेल्या अनेक महानगरपालिकांच्या तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेला कार्यक्रम राज्य सरकारने पारित केलेला नवीन कायदा आणि राज्यातील ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण या सर्व गोष्टींमुळे अनेक महिन्यांपासून संभ्रमावस्थेत होत्या.
पुणे – पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या काही महानगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचना देखील झाली त्यातील हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याआधीच राज्य सरकारने नवीन कायदा पारित करून राज्य निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेत जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द केली आणि निवडणुकीचं तापत असलेलं वातावरण पुन्हा शांत झालं.
याविरोधात सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला मार्च महिन्यात सुरू झालेल्या कार्यक्रम नुसार काम सुरू ठेवण्याचे आदेश देऊन आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची सूचना केली आहे राज्य शासनाच्या कायद्यावरील याचिकेवर सुनावणी जुलै महिन्यात होणार असल्यामुळे त्यातील काही मुद्द्यांवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासक नेमले गेले आहेत सद्यस्थितीमध्ये प्रारूप प्रभाग रचनेबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. तरी संपूर्ण कार्यक्रमांसाठी नव्वद दिवसांचा कालावधी यामध्ये राज्य निवडणूक आयोग घेऊ शकेल पावसाळ्यात निवडणूक घेणे अडचणीचे ठरेल या युक्तिवादा वर हा निर्णय होण्याची शक्यता जास्त असली तरी विशिष्ट राजकीय पक्षातील काही वरिष्ठ नेतेही जूनमध्येच निवडणूक व्हावी यासाठी आग्रही धोरण ठेवून त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
प्रशासक नेमल्यानंतर त्यांच्या मुदती संबंधित कायद्यातील तरतुदी लक्षात घेता या निवडणुका साधारणतः ऑगस्ट अखेरपर्यंत होण्याची शक्यता अधिक आहे याआधी दोन वेळेस ठरलेले कार्यक्रमात बदल झाल्यामुळे सर्व इच्छुक उमेदवार देखील तयारी पुन्हा सुरू करण्यासाठी संभ्रमावस्थेत आहेत.
माझ्या कंपनीमार्फत सेवा घेणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांना आणि इच्छुक उमेदवारांना योग्य त्या सूचना देऊन त्या पद्धतीने तयार राहण्यास सांगितले आहेत तरी सर्व उमेदवारांनी ग्राउंड लेव्हल वरील कामाचा आढावा घेऊन इतर सर्व आघाड्यांवर पुन्हा काम जोमाने सुरू करणे सोयीचे राहील.