आदिती रणसिंग सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो :आमदार संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी: स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील परीक्षेमध्ये भाग घ्यावा विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून मेहनतीच्या व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठवे आदिती रणसिंग हि इयत्ता ६ वी मधील विद्यार्थिनीने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वजण कौतुक करत आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होत असते बालवयातच विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेमध्ये भाग घ्यावा आदिती रणसिंग हिच्या यशाची इतर विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भविष्याची वाटचाल करावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल ची विद्यार्थिनी आदिती रणसिंग हिने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, जयसिंग रणसिंग, महेश दरेकर, राम नांदे, अमोल देशमुख, संतोष काकडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल ची विद्यार्थिनी आदिती रणसिंग राहणार सारसनगर हिने केंद्र शासनाच्या चंद्रपूर येथील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये खुल्या प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव केला जात आहे