शबनम न्युज | पिंपरी
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त आवश्यक उपाय योजना करा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पुढील जुन महिन्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरु होता आहे सोमवार दिनांक २० जुन २०२२ रोजी श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी चे प्रस्तान होणार आहे मंगळवार दिनांक २१ जुन २०२२ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी चा पहिला मुक्काम हा आकुर्डी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आहे तरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त त्यासाठी आवश्यक असणारी स्थापत्य विभागची कामे मंडप स्पीकर व्यवस्था, फिरते शौचालयाची व्यवस्था,पालखी सोहळ्यासाठी येणारे वारकरी व नागरिकांसाठी पिण्याच्या व वापरण्याचा पाणीपुरवठाची व्यवस्था तसेच वैद्यकीय व्यवस्था पालखी मार्गा मधील अडचणी व रसत्याच्या दुरुस्तीची कामे करावी, वर्षानुवर्षे या पालखी सोहळ्या साठी आकुर्डी परिसरात लाखोंच्या संख्येने वारकरी व भाविक भक्त येत असतात.त्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील शाळांमध्ये,कार्यालये,मंदिरे मनपा हॉल तसेच काही खुल्या जागेवर मंडप टाकून देण्यात यावे, सदरविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व बाबीचा विचार करता लवकरात लवकर या वर नियोजन करावे, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.