शबनम न्युज | पुणे
सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे कलम 73 व 74 अन्वये दुरूस्ती करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण असले पाहिजे व ते कायम टिकून रहावे, त्याच बरोबर चितोडी रजपुत लोहार (घिसाडी) समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्यामुळे मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याचा सरकारचा निर्णय माघे घेण्यात यावा. या मागण्या उद्योजक दत्तात्रय सुरवसे, कार्याध्यक्ष रावसाहेब पोवार, सचिव चंद्रशेखर पवार, खजिनदार दिलीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखली घेण्यात आल्या, तसे पत्र चितोड रजपूत लोहार घिसाडी समाज महाराष्ट्र राज्य, समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधान भवन, पुणे येथे सामाजिक न्याय विभाग आणि महिला बाल कल्याण विभागाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष दत्तात्रय पवार सातारा, संघटक सुरेश चव्हाण पूणे, किशोर पवार संतोष पवार, नामदेव चव्हाण उपस्थित होते.