शबनम न्युज | पुणे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये गणेश क्रीडा कला सभागृहात जाहीर सभा झाली. संभाजीनगरचा उल्लेख करताना, नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा चांगलाच समाचार राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत घेतला. संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?… अरे तू कोण आहे?, सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बृजभूषण सिंह यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. अयोध्या दौऱ्याआधी, मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता १२-१४ वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.