शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना , मुळा व इंद्रायणी नद्यांचे सुशोभीकरण तसेच पर्यटन करण्यासाठी केंद्र शासनाच्या अख्यातरीत असणाऱ्या योजनेचा अभ्यास करून तात्काळ अहवाल केंद्र शासनास पाठवावा, अशी मागणी सुरज गजानन बाबर (अध्यक्ष :कृषी ,पर्यावरण ,शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना) यांनी माननीय प्रधान सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व संचालक,
पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते तसेच पिंपरी-चिंचवड ही संतांची भूमी म्हणून तिचा नावलौकिक आहे तसेच या भूमिकेतूनच पवना ,मुळा व इंद्रायणी या सारख्या नद्या वाहतात. आजमीतिला या नद्यांचे संवर्धन सुशोभीकरण तसेच या नद्यांवर पर्यटन होणे ही काळाची गरज आहे.
आपण सोबत जोडलेले केंद्रीय संस्कृती, पर्यटन तथा उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्री भारत सरकार ,जी .किशन रेड्डी साहेब यांचे स्वर्गीय मा खासदार गजानन बाबर साहेब यांना 8 डिसेंबर 2021 रोजीचे पत्र. तसेच मा सहाय्यक संचालक, पर्यटन विभाग भारत सरकार प्रविर चक्रवर्ती साहेब यांचे मा संचालक पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांना 18 मे 2022 रोजीचा ई-मेल द्वारे निर्देश. पाहिले असता आपल्या लक्षात येईल की भारत सरकार यांनी सकारात्मक भूमिका यासाठी दर्शवली असून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे मागवला आहे तसेच केंद्र सरकार पर्यटन मंत्रालय राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांना पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PRASHAD (Pilgrimage Rejuvenation & Spiritual, Heritage Augmentation Drive), Swadesh Darshan and Assistance to Central Agencies (CFA) for development of Tourism प्रसाद (तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह), स्वदेश दर्शन आणि केंद्रीय एजन्सींना सहाय्य (CFA) या योजनांतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करते
वास्तविक पाहता, निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.
पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.
गतवर्षी 120 कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध स्थांनांना भेटी दिल्या आहेत. ही संख्या 2030 पर्यंत 180 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. या संधीचा उपयोग करून शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटनाचा यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.
औद्योगिकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले आहेत व गुण्यागोविंदाने येते राहत आहेत आज आपण जर पाहिले तर टाटा मोटर्स ,जनरल मोटर्स ,बजाज आयटी हब ,यासारख्या मोठ-मोठ्या कंपन्या येथे आहेत तसेच देहू, आळंदी यासारख्या तीर्थ क्षेत्रामुळे तसेच पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या लेण्या व गडकिल्ले यामुळे बहुसंख्य पर्यटक येथे येत असतात आज आपण जर पाहिले तर या नद्यांचा उपयोग व त्यांचे सुशोभीकरण केले तर नद्याही प्रदूषण मुक्त होऊन पर्यटनाला चालना मिळायला उपयोग होईल व अनेकांना रोजगारही प्राप्त होईल त्यामुळे आपण यावर गांभीर्याने विचार करावा जेणेकरून खूप मोठा मोलाचा हातभार या पिंपरी-चिंचवडला आपल्यामुळे लाभेल.
पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.
पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.आणि म्हणून सामाजिक ,आर्थिक , पर्यावरणपूरक, रोजगाराच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नदीसंवर्धन ,सुशोभीकरण करावे तसेच या नद्यांवर पर्यटनासाठी आपण या राज्याचे पर्यटन विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून पुढाकार घ्यावा, तसेच उपरोक्त संदर्भानुसार केंद्र शासनाने आपणास मागवलेला सविस्तर प्रस्ताव व अंदाजपत्रक केंद्र शासन पर्यटन विभागाकडे पाठवावे जेणेकरून यावर तत्परतेने कार्यवाही होईल व स्थानिक लोकांना पर्यटन व्यवसायामुळे रोजगार तसेच नद्या प्रदूषणमुक्त व त्यांचे संवर्धन झाल्यामुळे चांगले आरोग्य प्राप्त होईल. असे हि सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.