शबनम न्युज | मुंबई
राज्यसभा निवडणुकीसाठी माघार घेण्याची मुदत आज संपली असली तरी शिवसेना आणि भाजप पैकी कोणीच माघार घेतली नसल्याने प्रत्यक्ष मतदान होऊन घोडेबाजार होण्याची चिन्हे असल्याचे दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत होती. भाजप तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनाही दुसरी जागा लढणार असून महाविकास आघाडीचे चार उमेदवार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Advertisement