नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास न्यायालयाचा नकार
शबनम न्युज | मुंबई
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागणाऱ्या महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या सुधारित याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. तसेच अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. तसेच संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.