शबनम न्युज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील देहू मध्ये संत तुकाराम महाराज मंदिराचे लोकार्पण केले. यानिमित्ताने झालेल्या सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. या कार्यक्रमात अजित दादांना बोलू दिले नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, व आमच्या सर्वांचे नेते आहेत. या कार्यक्रमात अजित दादा यांना भाषण करण्याची वेळ द्यावी, याकरिता विनंती करण्यात आली होती. परंतु, पंतप्रधान कार्यालयाने आमच्या विनंतीला उत्तर दिले नाही. असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, हे अतिशय गंभीर आहे व मला स्वतःला वेदना देणारा आहे. कारण अजित दादा हे आमचे नेते आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल वापरला गेला नाही, हे अतिशय धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.