मी लग्नानंतर एकदाही वडाला फेरे मारले नाहीत – रुपाली चाकणकर
शबनम न्युज | पुणे
आपल्या पतीला उत्तम आयुष्य मिळावे आणि पतीचे आरोग्य लाभण्यासाठी महिला वटपौर्णिमा साजरा करतात. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे, या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. या वटपौर्णिमेनिमित्त राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाही, आणि माझ्या नवऱ्याने कधी तसा हट्ट पण केला नाही, आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतीबाची सावित्री अजून समजलेली नाही, असे वक्तव्य रूपाली चाकणकर यांनी केले आहे.
वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरी मारून सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्नानंतर एकदाही वडाला फेरे मारले नाही. हेरवाडच्या हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बोलत होत्या.