शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
११ जून रोजी विश्रांतवाडी परिसरातील दगडखाणीच्या पाण्यातून मासेमारी करणाऱ्या दोन तरुणांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.पुणे शहर पोलिसांनी विकी लंके (वय, २०) आणि सुशांत बदाडे (वय, २१ , दोघेही विश्रांतवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. येरवड्यातील पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या प्रसन्न उर्फ गोट्या थूल (वय, २१) या तरुणाला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आणखी एकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, कोविड लॉकडाऊन दरम्यान, आरोपी आणि पीडितांमध्ये वाद झाला होता. तसेच, पोलिसांनी सांगितले की, पीडित विकी लंके याने आपल्या महिला नातेवाईकाशी गैरवर्तन केल्याबद्दल आरोपींकडे चौकशी केली होती.
त्यामुळे आरोपींनी ६ जून रोजी विकी आणि सुशांत यांना दारूच्या मेजवानीसाठी बोलावले. दोघांनी मद्य प्राशन केल्यानंतर आरोपींनी त्यांना ७ जूनच्या पहाटे विश्रांतवाडी येथील कस्तुरबा हाउसिंग सोसायटीजवळील दगडखाणीच्या पाण्यात ढकलून दिले.
पीडित कुटुंबीयांनी ८ जून रोजी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, ११ जून रोजी दगडखाणीत मृतदेह आढळून आला आणि दुसऱ्या दिवशी १२ जून रोजी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिस तपासात त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.