शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मागितली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. यांनतर आता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मंत्र्यांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील मीनाक्षी अरोरा यांनी न्यायमूर्ती सीटी रविकुमार आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला आणि आजच या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
त्यांनी पोलिसांच्या एस्कॉर्टचा वापर करून मतदान करण्यासाठी त्यांची तात्पुरती सुटका करण्याची परवानगी मागितली. यापूर्वी, मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाच्या जामीनासाठी दाखल केलेल्या याचिका फेटाळल्या होत्या.