शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
अनेक गटांनी पुकारलेल्या भारत बंदमुळे विविध राज्य सरकारांनी सुरक्षा कडक केल्याने केंद्राच्या अग्निपथ योजनेविरोधातील निदर्शने सोमवारीही सुरूच होती. अग्निपथ योजनेवरून झालेल्या आंदोलनामुळे तब्बल ४८३ रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या.
तसेच उत्तर रेल्वेच्या विविध टर्मिनल्सवरून नियोजित एकूण १८ पूर्वेकडील रेल्वे सेवा आज रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या अग्निपथ भरती योजनेला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जवळपास ७१ प्रवासी गाड्या (रिटर्न सेवेसह) आज रद्द करण्यात आल्या आहेत.पश्चिम रेल्वे विभागातील रेल्वे सेवा कालही प्रभावित झाली होती. केंद्राच्या नवीन अग्निपथ भरती योजनेला विरोध होत असताना सोमवारी अनेक राज्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Advertisement