शबनम न्युज | मुंबई
विधान परिषदेची मतदान प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीची असते. अशा प्रक्रियेमध्ये आपण मतदान केल्यानंतर ती मतपत्रिका स्वत: फोल्ड करून मतपेटीत स्वत:च्या हाताने टाकायची असते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळला आहे.
यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची १५ मिनिटांपासून बैठक सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु होईल.
Advertisement