शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. दहा जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान पूर्ण झालं. अत्यंत चुरशीची लढत या विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळाली. सकाळी ९ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी पूर्ण झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. तशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळल्यानंतर मतमोजणी सुरुवात झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप चे एक-एक मत बाद केल्यानंतर आता निकाल जाहीर झाला आहे.
या पहिल्या फेरी मध्ये काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना २६ मते तर चंद्रकांत हांडोरे यांना २२ मते तर शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांना २६ तर सचिन अहिरे यांना २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांना २९ तर रामराजे निंबाळकर यांना २८ मते मिळाली. तसेच भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना ३० तर प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली आहे. आणि तसेच प्रवीण दरेकर यांना २९ मते मिळाली आहे. तर श्रीकांत भारतीय यांना ३० तर उमा खापरे यांना २७ मते मिळाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे.या निवडणुकीत परत एकदा भाजप ने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.