शबनम न्युज | मुंबई
एकीकडे विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकासआघाडीची अनेक मतं फुटली आणि भाजपाने त्यांच्या सर्व पाच जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
सोमवारी लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यात आज सकाळपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रीचेबल झाल्यामुळे राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २० ते ३५ खासदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनीशिवसेना सोडून वेगळा गट स्थापन केला तर त्यांच्यासमोर काय पर्याय असतील, याच्या काही शक्यता समोर आल्या आहे.