शबनम न्यूज | मुंबई
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देहू येथे झालेल्या एका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. यांसनुसरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना महाराष्ट्राबाहेर नेलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.आज महाविकासआघाडी सरकारची आज एक मंत्रिमंडळ बैठक पार होणार आहे. या बैठकीबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता, सर्व काही ठिक असल्याचे वाटत आहे. मला आजचीही मंत्रिमंडळ बैठक नेहमीचीच असल्यासारखे वाटत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर मी भाष्य करणार नाही. आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आज मुंबईत आहेत. त्यांची बैठक होईल. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, शिवसेनेत जे घडले ते अनपेक्षित आहे. सर्व काही सुरळीत आहे, असे वाटत असताना अचानकच असे काही घडले, असेही छगन भुजबळ म्हणाले.