शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यातले वळण आले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी भाजपवर ताशेरे ओढले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या आसाममधील गुवाहाटीमध्ये किती दिवस लपून बसणार, असा सवाल करत अखेर त्यांना मुंबईला परतावे लागेल, असे ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले आहे.
ट्विट करत राऊत म्हणाले, “कब तक छिपोगे गुवाहाटी में… आना ही पडेगा चौपाटी में असे ट्विट राऊतांनी केले आहे. राऊतांचे हे ट्विट चर्चेचे ठरत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. अपात्रतेच्या सुनावणीसाठी आमदारांना सोमवारी मुंबईत हजर राहावे लागणार आहे.
कब तक छीपोगे गोहातीमे..
आना हि पडेगा.. चौपाटीमे.. pic.twitter.com/tu4HcBySSO— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2022
Advertisement