शबनम न्युज | मुंबई
एकनाथ शिंदेंसोबत ४० शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. दरम्यान, पक्षातून घाण निघून गेली. जे गेले ते आपले कधीच नव्हते, बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव घ्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांची लायकी नाही. अशा शब्दात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. शनिवारी हाजीअली येथील लालालचपतराय महाविद्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आदित्य बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, ज्यांना मित्र मानायचो त्यांनी दगाफटका केला. चांदिवलीचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी तर काही दिवसांपूर्वी माझा हात पकडून मला मिठी मारली आणि रडत ते म्हणाले, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. ते प्रत्येक आठवड्याला माझ्या कार्यालयात यायचे, त्यांनी सांगितले कोणतेही काम मी केलेले नाही हे दाखवून द्यावे, त्यांच्याबरोबरच मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलेली कामे पूर्ण केली आहेत. आमदार प्रकाश आंबेडकर तर खूप जवळचे होते. ही माणसे अचानक निघून जातात आणि समोरून बोलतात तेव्हा वाटते की आपले काय चुकले? अशा भावनाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या.