शबनम न्युज | मुंबई
एकनाथ शिंदेंसोबत ४० शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. दरम्यान गुवाहाटीत हॉटेलमधील दोन बंडखोर आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गुवाहाटीत हॉटेलमधील दोन बंडखोर आमदारांमध्ये मारामारीची घटना ही खोटी असल्याची माहिती आहे. आमदार प्रकाश आबिटकरांनी असे खुलासा केला आहे. ते म्हणाले कि, ही घटना खोटी आहे. कोणीतरी खोडसाळपणे हे वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. असे काहीही झालेले नाही. “मी एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गुवाहाटीत असलेल्या आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी पाहिली होती. या बातमीत माझ्याही नावाचा उल्लेख होता. अशा पद्धतीची कोणतीही घटना या हॉटेलमध्ये घ़डलेली नाही. या सर्व गोष्टी संपूर्णत: अफवा आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका” असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.