शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.
तसेच यावेळी बोलताना अबू आझमी म्हणाले कि, जुने शहरांची नावे बदलून काय होणार? तुम्ही नवे शहर बनवा, आम्ही ही स्वागत करू. शहरांची नावं बदलून काय होणार आहे? बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरं बनवा, आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करु. मुस्लिमांची नावं बदलून काय उदाहरण दिलं जात आहे अशी विचारणा अबू आझमी यांनी केली आहे.
Advertisement