शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, अध्यक्षांचा आदर व्हावा, यासाठी आपण काही यंत्रणा आणली पाहिजे. सदस्याला पूर्ण बोलू द्यावं यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादा सदस्य व्यक्त झाल्यावर बोलण्याची संधी असते असं जयंत पाटील म्हणाले.
“आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु,” असं मिश्कीलपणे जयंत पाटील म्हणाले.
Advertisement