शबनम न्युज | मुंबई
प्रभाग क्र. १५ मधील गणेश तलाव मधील जलपर्णी काढा, अशी मागणी निखिल दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १५ निगड़ी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. वाढलेल्या जलपर्णी मुळे तलावाच्या आजू -बाजुच्या परिसरात मच्छर डास यांचे प्रमाण वाढले आहे. गणेश तलावाची स्वच्छता होत नसल्या मुळे परिसत दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णी मुळे तलावात पाणी आहे कि, नाही हे देखील समजुन येत नाहीये संपूर्ण गणेश तलाव मध्ये मोठ्या प्रमाणता जलपर्णी परसली आहे येत्या सेप्टेंबर महिन्यात म्हणजेच ०९ सेप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे. गणेश तलाव येथे ही विसर्जन घाट आहे दर वर्षी परिसरातील लाखो भाविक आपले गणपती विसर्जन करण्यास गणेश तलाव येथे येत असतात तरी अनंत चतुर्दशी अगोदर गणेश तलाव मधील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करावा, अशा स्थानिक नागरिकांच्या भावना आहेत. जलपर्णी मुळे परिसरात होणारे मच्छर, डास व जलपर्णी मुळे परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीचा ही परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी गणेश तलाव मधील जलपर्णी व साठलेली घान लवकरात लवकर काढून गणेश तलाव स्वच्छ करावा, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.