शबनम न्युज | लोणावळा
गेल्या २४ तासात लोणावळा शहरात तब्बल १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.लोणावळा शहर, परिसराकडे पर्यटन नगरी म्हणून पाहिलं जातं. भुशी धरण, सह्याद्रीच्या डोंगर- दऱ्यांमधून वाहणारे धबधबे हे अनुभवण्यासाठी, मक्याचं कणीस, भजी याचा आस्वाद घेण्यासाठी पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडसह देशभरातून नागरिक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाचा जोर वाढला असल्याने पर्यटकांचा ओघ लोणावळ्यात वाढला आहे.
टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यामुळं लोणावळा शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. गेल्या वर्षी देखील तोच नियम लागू करण्यात आला. मात्र, करोना च प्रमाण कमी झाल्याने नियम झुगारून पर्यटक लोणावळ्यात, भुशी धरण, येथे दाखल व्हायचे. तेथील व्यवसायकांचा पोट याच पर्यटकांवर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी करोना आटोक्यात आला असून निर्बंध नाहीत त्यामुळं पर्यटक आणि व्यवसायिक दोघे ही आनंदी आहेत.