शबनम न्युज | मुंबई
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेना बंडखोर आमदारांची अपात्रता, नव्या सरकारची वैधता, विधीमंडळातील कामकाज यावर सुनावणी झाली. यात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आज शिवसेना, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेत या प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर दिल्लीत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अरविंद सावंत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आता यापुढे अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोरच येणार आहे. अन्य कुणालाही यावर निर्णय घेता येणार नाही. यानंतर वकील हरीश साळवे यांनी वेळ मागितला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचं अधिवेशन झालं त्याचे ‘प्रोसिडिंग’ सील करण्यास सांगितले आहे. हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.”