शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मच्छर व डास यांच्या मुळे होणारे रोग म्हणजेच डेंगू मलेरिया स्वाइन फ्लू बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना करा, अशी मागणी निखिल दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विट्ठल प्रतिष्ठान) यांनी मा.आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग अ क्षेत्रिय कार्यालय यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहहे कि, पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील दहा ते पंदरा दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस झाल्या मुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नाले सफाईचा फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईनचे घाण पाणी चोकअप होऊन ते बाहेर उघड्यावर येत आहे. गटार मधून घान कचर रस्त्यावर येत आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात मच्छर व डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १४ आकुडी व प्रभाग क्रमांक १५ प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणात मच्छर व डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदि साथींचे आजार तसेच डेंगू सारखे माणसांचा जीव घेणारे आजारी रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढ होत आहे.
त्यामुळे या पुढच्या काळात डेंगू,मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव परिसरात अधिक वेगाने होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी व धुर फवारणी करणे व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवल्यास प्रभाग क्रमांक १४ आकुर्डि व १५ प्राधिकरण मधील अनेक सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येन्या पासुन वाचु शकतात तरी आमच्या या तक्रारीची योग्य दखल घेऊन प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ मधे योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.