शबनम न्युज | मुंबई
आज शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना “कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात २ लोकांचं जम्बो सरकार” असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच “राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे… खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे” असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
आता शिवसेना पक्षाला सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. तसेच आज मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
Advertisement