शबनम न्युज | पिंपरी
फुगेवाडी हायवे ते दापोडी ब्रिज रस्ता रूंदीकरण करताना ज्यांची घर गेलीत अशा बाधितांना ४६ गाळे महानगरपालिका कडून देण्यात आले होते, त्या एकूण ४६ गाळ्यांचा सर्वे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करण्याची मागणी भारतीय कामगार संघटना पिं. चिं. शहरअध्यक्ष सुषमा अजित शेलार यांनी व सहकारी असफक शेख भा.का.सं. विभाग प्रमुख, जेष्ठ शिवसैनिक अनिल भाऊ तारू व बाळासाहेब कांबळे यांनी सुषमा शिंदे मॅडम (सक्षम प्राधिकरण तथा सहाय्यक आयुक्त , झोपडीपटटी निर्मुलन व पुनर्वसन विभाग) यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, २००६ साली फुगेवाडी हायवे ते दापोडी ब्रिज रस्ता रूंदीकरण करताना ज्यांची घर गेलीत अशा बाधितांना ४६ गाळे महानगरपालिका कडून देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ११ गाळे बाधित नागरिकांना देण्यात आली, मग ३५ बाधित नागरिकांना कुठे स्थलांतरीत करण्यात आले, त्याच बरोबर ३५ गाळ्यांचं काय झालं? जे फक्त बाधित झालेल्या नागरिकांसाठी बांधले गेले होते.त्या एकून ४६ गाळ्यांचा सर्वे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी सोबत करा, असे ही सदर निवेदनात सुषमा शेलार यांनी नमूद केले आहे.