शबनम न्युज | मुंबई
महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ नगरविकासच नव्हे तर अनेक खात्यांचे निर्णय युवराज घ्यायचे, असा खुलासा करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तसेच युवराजांचा बालहट्ट आणि अहंकारापायी मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली. ते म्हणाले महाविकासआघाडी सरकारच्या काळात ही सर्व खाती रिमोट कंट्रोलने कोण चालवत होतं? ही खाती मातोश्रीवरुन चालवली जायची की किचन कॅबिनेटमधून? असा सवाल विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना भातखळकरांनी केला.
Advertisement