शबनम न्युज | पुणे
आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा समाचार घेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणतायत ५० खोके एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के ,आम्ही आहोत पक्के असं ते यावेळी म्हणाले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होत. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं होत. यावरच आठवले यांनी पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा समाचार घेतला आहे.