शबनम न्युज | पिंपरी- चिंचवड
निगडी येथील असोशिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट्स (पुणे)च्या सन 2021-22 च्या कमिटीसाठी निवडणूक 20 वर्षांच्या खंडानंतर झाली. त्यात विविध प्रकारे गैरव्यवहार झाला आहे. परप्रांतीय ट्रान्सपोर्ट बंधुना मतदाना पासून न्याय हक्कापासून वंचित ठेवणे व कोणत्याही परिस्थितीमध्ये मर्जीतील उमेदवार विजयी करण्यासाठी नियमांची पायमल्ली करण्यात आली, अशी तक्रार असोशिएन बचाव कमिटीचे अध्यक्ष रवी खन्ना व सदस्य जयवंत जाधव यांनी केली आहे.
त्याबाबत तक्रार पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालय दाखल केली आहे, स्वयं घोषित असोसिएशन कमिटी के खन्ना व जाधव यांच्या विरोधात पोलिसांकडे खोटा तक्रार अर्ज दाखल केला होता . त्यानंतर पोलिसांनी योग्य तपास करुन आम्हाला न्याय दिला व अर्ज निकाली काढण्यात आला होता.त्यानंतर आम्ही न्याय हक्कासाठी चारिटी कोर्टात प्रतेक तारखेस हजर असतो, चॅरिटी कोर्टाने यांना परवानगी दिलेली नाही. परंतु हे जनरल बाँडीची मिटिंग घेवून असोसिएशन ची घटना बदल करुन स्वार्थासाठी कायमस्वरुपी मालकी हक्क तयार करत आहेत, या चुकीच्या कामासाठी आमचा त्यांना विरोध आहे, आम्ही असोसिएशन बचाओ कमिटी च्या माध्यमातून त्यांना हरकत घेत असतो, यावेळी सर्व ट्रान्सपोर्ट बंधु मोठ्या संख्येने हुकुमशाही व एकाधिकारशाही च्या विरोधात न्याय मागण्यासाठी एकवटले होते, या वेळी मा अध्यक्ष अशोक शेठ काळे,दलबीरसिंह चौधरी ,असोसिएशन ट्रस्टी विनोद शर्मा, व माजी सदस्य रोहितास चौधरी, तरूण शर्मा, बनवारी आगरवाल व अनेक सदस्य उपस्थित होते.
रवी खन्ना व जयवंत जाधव यांनी सांगितले की, असोशिएशनची निवडणूक 20 वर्षानंतर 30 ऑक्टोबर 2021 ला झाली. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी दोन निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकार्यांशी संगनमत करून सरसकट 2 हजार रूपये घेऊन थेट सदस्यत्व देण्यात आले. त्यांना मतदानांचा अधिकार बहाल करण्यात आला. जमा झालेल्या रक्कमेचा कोणताही हिशोब ठेवण्यात आलेला नाही. या संदर्भात चौकशी करण्याची तक्रार या पूर्वीच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
एकूण 402 पैकी 344 जणांनी मतदान केले असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एका मतपेटी 200 आणि दुसर्या मतपेटीत 144 मते होती. 144मते असणारी पेटीतील मते सर्व उमेदवारांना मिळाली व 200 मतदान असलेली पेटीतील 200 मते फक्त सात उमेदवारांच मिळाली त्यांना प्रत्येकी 200 मते मिळाली. 200 मताची पेटी बदल्याण्यात आल्यामुळे निवडूण येणारे प्रामाणिक उमेदवार निवडणूक हारले व क्षमता नसणारे उमेदवार निवडणूक जिंकले
म्हणजेच 200 मताची पेटी पूर्व नियोजित,पोलिंगऐजन्ट न ठेवणे,कट कारस्थान करुन निवडून येण्यासाठी मतपेट्या बदलण्यात आल्या. मतमोजणीच्या वेळी पोलिंग एजंटला उपस्थित राहू दिले नाही, अशी तक्रार रवी खन्ना व जयवंत जाधव यांनी केली आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कोणतीही पूर्वपरवानगी न घेता असोशिएनच्या कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली. कार्यालयातील कर्मचार्यांसाठी असोशिएनच्या खात्यातून दरमहा 10 हजार रूपये काढले जात आहेत. तसेच, असोशिएशनच्या घटनेत मर्जीनुसार विविध बदल परस्पर करण्यात आले आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करून नियमानुसार निपक्ष:पातीपणे निवडणूक घेण्यात यावी. घटने प्रमाणे निवडणूक प्रतेक वर्षी घेण्यात यावी, अशी मागणी खन्ना व जाधव यांनी केली आहे.
बालाजी मित्र मंडळ ट्रस्ट के संस्थापक,अध्यक्ष जयवंत जाधव यांना पुढिल वाटचालीची विचारना केली असता –त्यांनी सांगितले कि न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत ,ते गेले अनेक वर्षे बालाजी मित्र मंडळ ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात, गणपतीवर त्यांची फार श्रध्दा आहे ते दर गणेश चतुर्थीला मोरगावचा मयुरेश्वरला दर्शनासाठी जात असतात, मंडळाच्या माध्यमातून ते दर गणेश चतुर्थी साजरी करतात व प्रतेक वर्षी सार्वजनिक गणपती बसवतात, व सामाजिक बांधिलकी जपतात.