शबनम न्युज | मुंबई
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर संजय राऊतांना सोमवारी (दि.५) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले आहे . मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेषन्यायालयाने धक्का दिला.
Advertisement
गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून १ ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. सुरूवातीला संजय राऊतांना ४ -४ दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर ८ ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.
Advertisement