शबनम न्युज | मुंबई
ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून, ओरबाडून, लोकशाहीचा अवमान करून महाराष्ट्रातील सरकारचा सुरु असलेला कारभार अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी जे लोक राजकारण व समाजकारणात आले आहेत त्यांना हा काळ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही तर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पैसे, ईडी याद्वारे सत्ता ओरबाडून घेतली. सत्तेच्या माध्यमातून खरंतर सर्वसामान्यांची सेवा करण्याची अपेक्षा होती. मात्र मागच्या अडीच महिन्यात या सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्याचे दिसत नाही, असे ताशेरे त्यांनी राज्य सरकारवर ओढले. राज्यात अडीच महिन्यांपासून कोणत्याही जिल्ह्याला पाकलमंत्री मिळालेला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी नवीन सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ मागितला असता त्यांच्याकडून वेळ मिळत नाही, अशी खंत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.