शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे शहरातील मुळा आणि मुठा नद्यांमधील पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या रस्त्याचा वापर टाळण्यास सांगितले आहे. मुळा आणि मुठा नद्यांच्या उर्ध्व भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारपासून त्याची तीव्रता वाढली.
मुठा नदीचे चार बंधारे क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारच्या वेळी हे प्रमाण २२,८८० क्युसेक होते आणि धरणांमधील पाण्याच्या प्रवाहानुसार त्यात बदल होईल,” असे मुठा नदीच्या वरच्या धरणांचे प्रभारी सहायक अभियंता वाय एस भांडेलकर यांनी सांगितले.
नागरिकांनी नदीत जाणे टाळावे व नदीकाठी उभी केलेली वाहने हटवावीत, असेही ते म्हणाले. गुरांना किनार्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. भांडेलकर पुढे म्हणाले, “प्रत्येकाने सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. तसेच मुळशी नदीतून १५,८४० क्युसेस, तर पवना नदीतून ५,६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.