Mumbai : अपात्र आमदार आणि सरकारच्या भविष्याबाबत घटना तज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे 16 आमदार अपात्र होतील यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे जर ते अपात्र झाले तर मग सरकारच कोसळेल असं उल्हास बापट यांनी सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही माहिती दिली सुप्रीम कोर्टाने 27 तारखेला निकाल देणे अपेक्षित आहे असेही उल्हास बापट यांनी म्हटले आहे, शिवसेनेला मिळालेली परवानगी ही घटनेला धरून आहे जर शिंदे गटाने कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाच निरीक्षण नोंदविला जातो कधी कधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतो मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे असे उल्हास बापट यांनी सांगितलं त्यांच्या या विधानाने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असेल संपूर्ण महाराष्ट्र हा सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष देऊन आहे.