कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे ; अतुल पेठे यांचे प्रतिपादन
मनोविकास प्रकाशनातर्फे नीलांबरी जोशी लिखित ‘माध्यम कल्लोळ’ ग्रंथाचे प्रकाशन व मुक्त संवादात अतुल पेठे बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी अभिनेते गिरीश कुलकर्णी, माध्यम अभ्यासक समीरण वाळवेकर, ज्येष्ठ पत्रकार रवि आमले, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.
अरविंद पाटकर म्हणाले, “वाचनसंस्कृती लोप पावतेय, हा माध्यमातून होणारा अपप्रचार आहे. आपण वाचकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. ही दुरावस्था थांबवण्यासाठी वाचकांनी जागृतपणे पुस्तके वाचली पाहिजेत. लोकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पुस्तकांवरील जीएसटीमध्ये सवलत द्यावी. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यात ललित साहित्याचे दुकान नाही, याची खंत वाटते.”
'माध्यम कल्लोळ' उलगडताना... "सर्वच प्रकारच्या माध्यमांचा जनमानसावर होणारा परिणाम यात मांडला आहे. मालिका, चित्रपट, प्राईम टाइम, ओटीटी प्लॅटफॉर्म, अटेंशन इकॉनॉमी, सनसनाटी बातम्या, जाहिराती, मोबाईल, इंटरनेट, स्क्रीन अॅडिक्शन, नोमोफोबिया, आत्मकेंद्री, सेल्फी, टेक्नोफेरन्स, सायबर बुलिंग, ट्रोलिंग अशा गोष्टींचा परिणाम समाजावर होतो. लाईक्स, कमेंटला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यातून सायबर गुन्हेगारी वाढीस लागते. या कल्लोळात आपणही बुडतो आहोत, या गोष्टी लक्षात येत नाहीत. अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यात केला आहे." - नीलांबरी जोशी, लेखिका