शबनम न्युज | मुंबई
देशात गॅस सिलेंडर महागले आहेत. सामान्य जनता या महागाईतून प्रचंड होरपळत आहे. यातच आता त्याच्या खरेदीवर मर्यादा घालून दिल्याने लोकांमध्ये प्रचंड आक्रोष वाढत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर केंद्र सरकावर ताशेरे ओढले.
केंद्र सरकारने सर्वप्रथम गॅस सिलेंडर वापरण्यासाठी प्रोत्साहित केले, त्यानंतर सबसिडी कमी करण्यात आली. हे सरकार गॅसचा व्यवसाय करत आहे अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. आता या गॅस खरेदीवर मर्यादा आणणे म्हणजे अधिकचा गॅस विकत घेण्यासाठी खुल्या बाजारात जो दर असेल त्या किंमतीतच सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे एक हजार रुपयात एक सिलेंडर दिल्यानंतर वाढीव सिलेंडर खुल्या बाजारातून खरेदी करताना अवाजवी किंमतीमुळे सामान्य नागरिक निश्चितच नाराज होतील, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.