शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव या ठिकाणी कला शाखेच्या वतीने प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कल्पना राठोड, वैष्णवी इप्पर, काजल फुंदसे, मनीषा टाकडा यांच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कला शाखेचे विभाग प्रमुख प्रा. कैलास अस्तरकर यांनी शाखेचे महत्व स्पष्ट करतांना या शाखेला स्पर्धेच्या युगात किती महत्वाचे स्थान असून या कार्यक्रमाचा उद्देश, ध्येय तसेच कला शाखेमध्ये किती विषयाचा समावेश असून त्या प्रत्येक विषयाला कसे महत्त्व आहे तसेच पुणे विद्यापीठाने पदवी शिक्षणात स्वीकारलेली श्रेणी पद्धत विद्यार्थ्यांसाठी कशी महत्वाची आहे याबाबत सविस्तर विवेचन केले.
यावेळी प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचा परिचय, मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाचा परिचय करून दिला तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी व सहाय्यक प्राध्यापक यांनी आपला परिचय करून देतांना महाविद्यालयात असणारे विविध विभाग व मंडळ यांचा खालील प्रमाणे परिचय करून दिला.परीक्षा विभाग – प्रा संजीव कांबळे, स्पर्धा परीक्षा विभाग प्रा.माणिक कसाब,इंग्रजी विभाग- प्रा. डॉ. छाया जोशी राज्यशास्त्र विभाग- प्रा.यशोदा खुळखुळे, इतिहास विभाग -प्रा. परमेश्वर भताशे भूगोल विभाग – प्रा. सविता मानके,विद्यार्थी विकासमंडळ-प्रा. शाहूराज येवते, उद्योजकता मार्गदर्शन विभाग – प्रा.डॉ. राजू शिरसकर, क्रीडा विभाग – प्रा. विकास दिघे,शिष्यवृत्ती विभाग – सुशेन राठोड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असून या प्रसंगी त्यांनी माणूस हा दोन वेळा यशस्वी होतो एक म्हणजे स्वप्न पाहतो त्या वेळी आणि जेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण होते त्यावेळी या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या मनोगतात अल्बर्ट आईन्स्टाईन, महात्मा गांधी,कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची तरुण पिढीला कशी आवश्यकता आहे हे विविध उदाहरणासह विवेचन केले. महात्मा गांधीनी सांगितलेल्या सत्य अहिंसा, अपरिग्रह, हरताळ, उपोषण या अनमोल मूल्यांची आधुनिक काळात कशी आवश्यकता आहे यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करीत भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी कथा,कविता व नृत्यातील वेगवेगळे कला प्रकार सादर केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला मा.श्री. प्रवीण भावे, प्रा.दिलीप बारी, प्रा.दिपाली सोनवणे, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग,श्री. वैभव बडवे, श्री. श्रीकांत कांबळे व कला शाखेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी खांदवे व काजल फुंदसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भताशे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.