शबनम न्युज | बीड
राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रात जागा द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली आहे संत भगवान बाबा यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी चे पारायण केले आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक पाण्यावर म्हणजेच अरबी समुद्रात होणे गरजेचे आहे. भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असल्याने राष्ट्रीय संत भगवान बाबा हे संत असून महाराष्ट्र ही साधुसंतांची नव्हे तर महात्म्यांची भूमी असून संतांचे विचार देशाला पुढे नेऊ शकतात अशा संतांचे स्मारक अरबी समुद्रात होणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राष्ट्रीय संत भगवान बाबा यांचे स्मारकाला लवकरात लवकर जागा द्यावी अशी मागणी किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असे आव्हान गदळे यांनी केले आहे.