शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव या ठिकाणी वाणिज्य शाखेच्या वतीने प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कु. जागृती देवरे, कु.ईशा कुदळे, कु. धनश्री कुडेकर व कु. मनिषा गौड यांच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारी यांनी शाखेचे महत्व स्पष्ट करतांना वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या विविध संधी तसेच वाणिज्य शाखेला सहाय्यभूत ठरणारे विविध कोर्स व प्रात्यक्षिक परीक्षा आणि इंटर्नशिप कार्यक्रम यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचा परिचय व सांस्कृतिक विभागाचा परिचय करून दिला तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी व सहाय्यक प्राध्यापक यांनी आपला परिचय करून देतांना महाविद्यालयात असणारे विविध विभाग व मंडळ यांचा खालील प्रमाणे परिचय करून दिला.परीक्षा विभाग – प्रा संजीव कांबळे, स्पर्धा परीक्षा विभाग-प्रा.माणिक कसाब, ग्रंथालय विभाग- प्रा शैला वाळुंज, ऍड ऑन कोर्स प्रा. डॉ.छाया जोशी व प्रा.विश्वनाथ व्यवहारे, विद्यार्थी विकासमंडळ-प्रा. शाहूराज येवते, उद्योजकता मार्गदर्शन विभाग – प्रा.डॉ. राजू शिरसकर, क्रीडा विभाग – प्रा. विकास दिघे,शिष्यवृत्ती विभाग- श्री.सुशेन राठोड. यावेळी प्राचार्यांचा परिचय प्रा दिपाली सोनवणे यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी जाणिवा संपन्न ठेवून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी जीवनात सदैव यशस्वी होतो तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध करिअरच्या वाटा उपलब्ध आहे असे मत मांडले. प्रत्येक महाविद्यालयातील पहिली संपत्ती विद्यार्थी असून दुसरी संपत्ती ही शिक्षक आहे यासंदर्भात भाष्य करीत आधुनिक काळात विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संगणक शिकणे कसे महत्त्वाचे आहे यासंदर्भात विवेचनकेले.विद्यार्थ्यांनी उद्योजक बनले पाहिजे सोबतच आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असे मत व्यक्त करीत यशस्वी जीवनासाठी ध्यान,सकारात्मक सूचना, चांगल्या कल्पना, व्यायाम,वाचन व लेखन हे गुण स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.विद्यार्थ्यांना सुखी जीवनाचा मंत्र आयुष्यात कसा महत्वपूर्ण आहे यावर भाष्य करीत वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, गवळण, लावणी व नृत्य इत्यादी कला प्रकाराचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला मा.श्री.प्रवीण भावे, प्रा. कैलास अस्तकर, प्रा. परमेश्वर भताशे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग,श्री. वैभव बडवे,श्री. श्रीकांत कांबळे व वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राणी तोळणे व कु. वैशाली वरकड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. अश्विनी तापकीर हिने मानले झाली. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.