रफि सय्यद | संपादकीय
शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झाला परंतु यावर्षी दसरा मेळावा होत असताना या दसरा मेळाव्याला एक वेगळेच स्वरूप वेगळेच रूप प्राप्त झाले होते शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचे बंड तसेच शिवसेना आमची हे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रमाणे त्यांनीही दसरा मेळावा घेतला. परंतु उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा व एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा यात दसरा मेळावा कोणाचा यशस्वी झाला याची चर्चा हे मेळावे झाल्यानंतर सुरू आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांची आपापल्या मंचावर भाषणे झाली आपण या लेखातून त्यांच्या भाषणाचा सार घेणार आहोत उद्धव ठाकरे यांनी या दसरा मेळाव्यात भाषण करताना नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे तसेच भाजप यांच्यावर टीका केली त्याला प्रतिउत्तर देताना एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले या दोघांचा दसरा मेळावा पैकी कोणाचा दसरा मेळावा यशस्वी झाला हेही आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
प्रामुख्याने या दशहरा मेळाव्यात दोन्ही मंचावर आमचा बाप आणि तुमचा बाप खरं हिंदुत्व आणि खोटं हिंदुत्व गद्दार आणि खुद्दार गेल्या तीन महिन्यांपासून तीच ती रिपीट होणारे स्क्रिप्ट म्हणजे दसरा मेळावा चा ठाकरे शिंदे गटाचा सामना हिंदुत्व गद्दार आमचा बाप आणि तुमचा बाप निष्ठावंत आणि साहेब यांच्या पलीकडे गेल्या तीन महिन्यात काही घडलं नाही सहाजिकच तेच तेच सांगून आम्ही बोर झालोय आणि तेच ते ऐकून तुम्ही बोर झालाय पण तेच ते सांगून आपले राजकारणी मात्र एकदम उत्साहात आहे आता दसरा मेळाव्याचा सामना तेच ते ऐकवण्यासाठी झाला होता का ? आणि तेच ते ऐकवायचं होतं तर इतके गर्दी करण्याची आवश्यकता नव्हती.
निष्ठावंत ठाकरे गटाच्या दसरा मेळावा बाबत
शिवाजी पार्क या होम ग्राउंड पार्कवर हा सामना झाला शिवाजी पार्क हे 28 एकर चे मैदान ,दरवेळी हे मैदान पूर्ण क्षमतेने भरतं यंदा देखील असंच झालं , सभेचे फोटो पाहिले तर लक्षात येतं मैदानावर गर्दी झाली होती, दरवर्षी शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासाठी साधारण 70 टक्के पब्लिक ही मुंबईतून गोळा होत असते असं सांगितलं जातं त्यामुळे महाराष्ट्रभरातून गाड्या भरून लोक आणण्याची गरज ठाकरेंना जाणवली नसेल दुसरीकडे एकनाथ शिंदे च्या बंडाला मुंबई शहर आणि उपनगरातून म्हणावं तितका पाठिंबा मिळालेला नाहीये त्यामुळे गर्दी तर जमलेली.होती परंतु एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी नागरिक महाराष्ट्राच्या बाहेरूनही आले होते तसेच जे नागरिक महाराष्ट्र मधून आले त्यापैकी अनेक जणांना हे माहिती नव्हते की आपण मुंबईमध्ये कशासाठी आलो आहोत अनेक प्रसार माध्यमांनी या नागरिकांच्या मुलाखती घेतल्या व विचारले की आपण मुंबईमध्ये का आला आहात तर अनेक नागरिकांना आपण कशासाठी आलो आहोत कोणाचे भाषण ऐकण्यासाठी आलो आहोत हे माहीत नव्हते तसेच त्यांना जेवण मिळणार कपडे मिळणार पैसे मिळणार असले अमिष दाखविण्यात आले असल्याचे या प्रसार माध्यमांच्या द्वारे कळले एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेक जण उठूनही गेले जबरदस्तीने आलेली गर्दी ही जास्त काळ बसून राहत नाही हे या निमित्ताने दिसून आले.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात भावनिकता सहानुभूतीच राजकारण केलं, पहिल्या दिवसापासूनच आपला काँग्रेस – राष्ट्रवादी पासून सोबत जाण्याचा निर्णय शिंदे गटाची गद्दारी आणि आपल्याला एकट पाडण्याची भावना लोकांमध्ये रुजू देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसून आले, बहुमताच्या सामोरे न जाता राजीनामा देण्याची त्यांची खेळी सर्वात चुकीचा निर्णय होता असं कोर्टात जरी दिसत असलं तरी बाहेर मात्र या निर्णयातून त्यांनी सहानुभूती निर्माण केली आहे, अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिली नाही पण मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो शिवाय पुढे जाऊ शकत नाही असे डायलॉग्स मारून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या शारीरिक मर्यादांवर बाहेर पडता येऊ शकत नव्हतं हे अधोरेखित केलं, दुसरे म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करताना स्वतःच्या हिंदुत्वाची लाईन सांगून टाकली ठाकरेंनी आपल्या भाषणात गाई आणि महागाई याबद्दल विषय काढला सोबतच संघ आणि भाजपच्या हिंदुत्वाला काउंटर नरेशन देण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानामध्ये जाऊन डोके टिकवणारे भाजप नेते तसेच नवाज शरीफ च्या वाढदिवसाला न बोलवता केक खाऊन येणारा तुमचा नेता यांचं कडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का असा प्रश्न करत अडवाणी ते मोदी असं संपूर्ण भाजपचा हिंदुत्ववाद धार्मिक आहे हे सांगण्याचा ठाकरेंचा प्रयत्न होता आणि याचाच भाग म्हणून थेट संघावर आरोप करत मोहन भागवत काही दिवसांपूर्वीच मदरशात गेलते त्यांनी मुस्लिम धर्मगुरुंशी चर्चा केली , संघाने मुस्लिम सोबत संवाद साधला तर ते राष्ट्र कार्य आणि आम्ही केलं तर हिंदुत्व सोडलं असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. उत्तराखंडच्या अंकिता भंडारी खून प्रकरणाचा विषय देखील त्यांनी काढला हे सर्व प्रश्न उभारत संघाच्या आणि भाजपच्या हिंदुत्वाला प्रश्नचिन्ह उभा केला, शिवाय उस्मानाबाद आणि औरंगाबाद नामांतरांचे श्रेय स्वतःकडे घेऊन त्यांनी आपण हिंदुत्व सोडलं नसल्याच अधोरेखित केलं.
तिसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीची भाषा
येणाऱ्या निवडणुका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच लढल्या जातील प्रमुख विरोधक शिंदे आणि भाजप हेच असतील हेही त्यांनी स्पष्ट केलं तसेच शरद पवारांचे सहकार्याबद्दल त्यांनी भाष्य केलं , काँग्रेस राष्ट्रवादीसोबत असताना आपण नामांतरित करून दाखवलं असेही त्यांनी सांगितलं या सर्व गोष्टींमुळे एक सिद्ध झालं की उद्धव ठाकरेंना आगामी निवडणुका या महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून एकत्रित लढायचे आहेत , पण घटलेली संख्या हा जागा वाटपाचा निकष न ठरवता आपल्या मागे असणारी सहानुभूती हा निकष ठाकरें महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ग्राहय धरतील असे त्यांच्या भाषणावरून समजते आणि या पलीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहांचा घरगुती मंत्री म्हणून उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजप वर टीका केली उद्धव ठाकरे मोदी वर कधीच टीका करत नाही कालच्या भाषणात देखील मोदी वर टीका न करता त्यांनी आपली गाडी अमित शहांकडे वळवली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून शिवसैनिकांना भावनिक आवाहन करण्यात आले तसेच या दसरा मेळाव्याला जमलेले शिवसैनिक हीच माझी ताकद असून आपण विरोधकांना नमवणार असेही या भाषणाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले. संकटे कितीही आली तरी आपण घाबरणार नाही कारण शिवसेना ज्या ज्या वेळी संकटात आली त्याचा वेळी परत गरुड भरारी शिवसेनेने घेतली आपण हे लहानपणापासून पाहत आलो आहे असेही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सांगितले गद्दार ते गद्दारच असेही त्यांनी शिंदे गटांना संबोधित केले.
ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने टीका केली तीच पद्धत त्यांच्या भाषणात दिसून आली दसरा मेळाव्यानिमित्त वेगळे असे काही नवीन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सांगितले नाही.
एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या मुद्द्याबाबत
बाळासाहेबांच्या विचारांवर क्लेम करणं- व्यासपीठावर बाळासाहेबांची रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती शिंदेंनी शिवसेना बाळासाहेब यांच्या विचारांची आहे असं सांगितलं विचारांचे पाईक आणि शिलेदार आम्हीच आहोत हे स्पष्ट केलंच पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कसे सोडले हे देखील त्यांनी सांगितलं दुसरा मुद्दा म्हणजे
नैतिकता मिळवणं- नियोजनात परफेक्ट असणारे एकनाथ शिंदे सहानभूतीच्या लाटेत मागे आहेत पहिल्या दिवसापासूनच त्यांचे प्रयत्न आपल्या बंडखोरीला उठाव सिद्ध करण्याचा राहिला आहे आता ही नैतिकता मिळवायची असेल तर बाळासाहेबांचे खास आपल्या सोबत आहेत हे दाखवण्यास पहिल्या पासूनच शिंदेंचा भर राहिलेला आहे उद्धव ठाकरेंच्या दोन्ही सख्ख्या भावांचे कुटुंब शिंदे मेळाव्यास उपस्थित होतं बिंदुमाधव यांचे पुत्र निहार ठाकरे व जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे या मेळाव्याला हजर होत्या यावेळी जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना एकट पाडू नका असं विधान केलं तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या खुर्चीच्या मागे बरोबर थापा उभे असतील याचे नियोजन ही परफेक्ट केलं होतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे फार काळ सोबत राहणारे थापा हे काही दिवसापूर्वीच शिंदे गटात सामील झाले हे थापा या दसरा मेळाव्याचे निमित्ताने बाळासाहेबांच्या खुर्चीच्या मागे उभे होते.
भाजपच्या हिंदुत्वाला हायलाईट करण्याचा प्रयत्न
एकीकडे ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वाला काउंटर केलं पण इकडे एकनाथ शिंदेंनी भाजपच्या हिंदुत्वाची लाईन सांगितली सेनेचा हिंदुत्व आणि भाजपचा हिंदुत्व कसं एक होतं आणि हिंदुत्वासाठी आपण कसं एक झालो हे स्पष्ट करताना त्यांनी राम मंदिर ते 370 कलम हटवण्याचं बाळासाहेबांचे उद्गार आणि भाजपचे निर्णय सांगत त्यांनी पी एफ आय वरील बंदीचा मुद्दा अधोरेखित केला शिवाय दाऊदच्या हस्तकांसोबत संबंध व खरे वारसदार वगैरे वगैरे गोष्टी चर्चेत आणल्या.
ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट निष्ठावंत भाजप विरोध गद्दार अशी राहिली तर शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट हिंदुत्व बाळासाहेब आणि खुद्दार अशी राहिली म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून जे काही राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते आपल्याला पाहायला मिळालं विशेष असं काहीही नाही . एकंदर कोणाचा दसरा मेळावा यशस्वी झाला याच्यावर आपण आता बोलू उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे असंख्य गर्दी च्या उपस्थितीत संपन्न झाला उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमावी लागली नाही दरवर्षीप्रमाणे त्यांच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक स्वतःहून हजर होते स्वखर्चाने संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक या दसरा मेळाव्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रभावी होते यात शंकाच नाही याउलट एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातून तर महाराष्ट्र बाहेरूनही गर्दी जमिनीसाठी नागरिकांना बोलवावे लागले, गर्दी जमिनीसाठी एकनाथ शिंदे गटाकडून बसेस बुक करण्यात आल्या होत्या या बसेस साठी दहा कोटी रुपये खर्च करावे लागले या दसरा मेळाव्याला आलेल्या नागरिकांना ही माहिती नव्हते की आपण कोठे जात आहोत कोणाचे भाषण होणार आहे या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला तसेच एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेक जण उठून जात होते कंटाळून जात होते दसरा मेळावा हा कोणता यशस्वी झाला हे आपण या लेखातून पाहिलेच आहे.
आता शिवसेना कोणाची हा निर्णय होणे बाकी आहे आजच केंद्रीय निवडणूक आयोग समोर दोन्ही गटांच्या वतीने कागदपत्रे सादर करण्यात आली याचा निर्णय निवडणूक आयोग सोमवारी जाहीर करणार असल्याचं सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर करत असताना चाळीस आमदार बारा खासदार व 144 पदाधिकारी यांची कागदपत्रे तसेच सात लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली गेली असल्याचे प्रसार माध्यमांच्या वतीने सांगण्यात आले, तर ठाकरे गटाच्या वतीने 14 आमदार सहा खासदार व 250 पदाधिकारी तसेच लाखोच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केले गेले असल्याचे ही सांगण्यात आले शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाकडे जाणार याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.